Sunday, 13 June 2021

राधा आणी रुक्मिणीत “लक्ष्मी” कोण?

राधा आणी रुक्मिणीत “लक्ष्मी” कोण?

चराचर जगती रुक्मिणी आणि राधेचा संबंध श्रीकृष्ण सोबत आहे. स्थुल जगात रुक्मिणीला श्रीकृष्णची भार्या आणि राधाला प्रेमिका हि एकच ओळख आहे. परंतु कधी आपण हा विचार केला आहे का रुक्मिणी आणि राधा मधील नक्की कोणते स्वरूप साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे?

माता लक्ष्मी अती रहस्यमयी आहे. तिचा थांगपत्ता कोणाला हि कधी लागत नसतो. तरी हि अत्यंत स्वरूपवान,  करुणामयी, कृपासिंधु लक्ष्मी, क्षीरसागरात पती श्री महाविष्णु सोबत श्री महालक्ष्मी स्वरुपात विद्यमान आहेत. अवतारी स्वरुपात राधा होऊन श्रीकृष्ण सोबत गौलोक मधे विराजमान आहेत.

महाभारतात लक्ष्मीचे दोन रूप सांगितले आहेत. ‘विष्णुपत्नी लक्ष्मी’ आणि ‘राज्य लक्ष्मी’ यातील ‘लक्ष्मी’ विष्णु सोबत राहते आणि ‘राज्य लक्ष्मी’ पराक्रमी वीरपुरुष राजा सोबत विचरण करते.

ब्रह्मवैवर्त पुराणानुसार विष्णुच्या दक्षिणांगातुन लक्ष्मीचा आणि वामांगातुन लक्ष्मीचा अन्य एक अवतार राधाचा जन्म झाला आहे. ब्रह्मवैवर्त पुराण निर्देशित लक्ष्मी अवतार आणी तिचे प्रगट स्थान या प्रमाणे आहेत.

१.महालक्ष्मी वैकुंठात निवास करीत आहे.

२.स्वर्गलक्ष्मी स्वर्गात निवास करीत आहे.

३.राधाजी गौलोकात निवास करीत आहे.

४.राजलक्ष्मी (सीता) पाताळ आणि भूलोकात निवास करीत आहे.

५.गृहलक्ष्मी घरात निवास करीत आहे.

६. सुरभी (रुक्मिणी) गौलोकात निवास करीत आहे.

७. दक्षिणा यज्ञ-याग मध्ये निवास करीत आहे.

८.शोभा प्रत्येक वस्तुत (पदार्थ) निवास करीत आहे.

युधिष्ठीर ने पितामह भीष्मला लक्ष्मीच्या अनाकलनीय रहस्य बद्दल प्रश्न विचारला ज्याच्या उत्तरात भीष्मने लक्ष्मी-रुक्मिणी मधे झालेल्या संवादाची माहिती दिली आहे. महाभारतातील अनुशासनपर्व अनुसार लक्ष्मीने रुक्मिणीला सांगितले आहे कि माझे अस्तित्व तुझ्यात (रुक्मिणी) आणी राधेत समान आहे तसेच गोकुळातील गायी आणि त्या गायीच्या शेणात हि मी वास्तव्य करीत आहे.

श्रीकृष्ण तत्वदर्शनानुसार रुक्मिणीला देह आणी राधाला आत्मा मानला जातो. श्रीकृष्णचा रुक्मिणी सवे दैहिक तर राधा सवे आत्मिक संबंध मानाला जातो. रुक्मिणी आणी राधाच्या दर्शनाला एक अमाप गहनता आहे जर हि गहनता संपूर्ण सृष्टिच्या माध्यमातून पाहिली गेली तर त्याच्या तीन अवस्था आहेत. १.स्थुल २.सुक्ष्म ३.कारण

१.स्थुल – जे आपण डोळ्याने पाहु शकतो, त्वचेने स्पर्श करू शकतो ते सगळे “रुक्मिणी” आहे.

२.सुक्ष्म – जे आपले डोळे पाहु शकत नाही, ज्याला त्वचा स्पर्श करू शकत नाही, जे केवळ अनुभवले जाते (सुगंध, वारा, भावना) ते सगळे “राधा” आहे. 

३.कारण – जे काही ह्या स्थुल आणी सुक्ष्म अवस्थेचे “कारण” आहे ते कारण म्हणजेच कृष्ण आहे आणी हाच कृष्ण मूळ सृष्टिचे चराचर आहे.

अन्य दृष्टिकोनातून पहाता स्थुल म्हणजे देह आणी सुक्ष्म म्हणजे आत्मा. स्थुल मध्ये सुक्ष्म सामावु शकतो पण सुक्ष्मात स्थुल सामावु शकत नाही. स्थुल प्रकृती आणी सुक्ष्म योगमाया आहे, आधारशक्ती पण आहे परंतु कारण (कृष्ण)ची स्थापना आणी ओळख फक्त राधा (सुक्ष्म) होऊनच करता येते.

चराचर जगात आढळून येते कि तमाम “भौतिक व्यवस्था रुक्मिणी” आणी त्या मागे कार्य करण्याची “ऊर्जाशक्ती राधा” आहे आणी ज्यांच्यासाठी हि व्यवस्था करण्यात येत आहे ते “कारण म्हणजेच श्रीकृष्ण” होय. अंततः राधा आणी रुक्मिणी दोघी लक्ष्मी स्वरूप आहे परंतु जिथे रुक्मिणी दैहिक लक्ष्मी आहे तिथे राधा आत्मिक लक्ष्मी आहे.

संदर्भ – श्रीकृष्णतत्वदर्शन /श्रीमद् भागवत

कोंकण किनारी बसलो आमचो गाव, गाजता त्याचा मिठबांव नाव




देवगड : दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग हि निसर्गसौंदर्याची वरदान लाभलेली पुण्यभूमी ! त्यातही प्रत्यक्ष देवांचा अधिवास असलेला देवगड. हि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शौर्याची निशाणी. 

याच पुण्यभूमीत असलेले , मिठबाव तांबळडेग, कातवणच्या रयतेचे श्रद्धास्थान आहे.


ब्रिटीशांच्या मीठबंदी कायद्याविरुद्ध १९३० साली येथे मिठाचा सत्याग्रह झाला. त्या सत्याग्रहाच्या चळवळीचे सत्याग्रहींचे प्रमुख केंद्र हे श्री राशिवकालीन हिंदू-मराठा शैलीचे मिठबाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरमेश्वर मंदिर होते. छत्रपती शिवाजी महाराज कुणकेश्वर क्षेत्री आले तेव्हा त्यांचा पदस्पर्श या मिठबाव भूमीस झाला. खाडी पार करून इंदुल आचरेमार्गे ते कांदळगावला पोहचले. त्यानंतर राजे संभाजी महाराज, चिमाजी अप्पा, नानासाहेब पेशवे यांनीही या भागातील मंदिरात दर्शन घेऊन डागडुजी व नित्य धार्मिक कार्यासाठी सहाय्य केले. अमात्य निळकंठ बावडेकरांच्या अधिपत्याखाली व ८४ खेड्यांच्या श्री सिद्धेश्वर देवाच्या अखत्यारीत सारी देवस्थाने होती. मिठबाव श्री रामेश्वर मंदिराचा सुंदर कलाकुसर युक्त सभामंडप पेशवाईच्या पूर्वार्धात बांधला गेला. छत्रपती शाहू महाराजांचे मुतालिक चिमाजी अप्पा हे आपल्या प्रथम पत्नी रखुमाबाईंवर दैविक उपचारासाठी मिठबाव रामेश्वर मंदिरात आले. अरिष्ठ दूर करण्यासाठी त्यांनी श्री रामेश्वर देवाला पालखी नजर केली होती. अमात्य बावडेकर इंग्रजांच्या आमदानीत या विभागाचे सर्वाधिकारी होते. १७९५ साली मुराररावे राणे यांच्या नेतृत्वाखाली गाव शिष्टमंडळाने गाव रहाटीतील न्यायनिवाडा सवाई माधवराव पेशवे यांच्या आदेशाने करून घेतल्याचा दस्तऐवज आहे. १८९० च्या दरम्यान झालेल्या दंग्यात देवस्थान कारभारी कुळकर्णी ऐतिहासिक दफ्तर घेऊन परागंदा झाले. त्यामुळे हि मौखिक माहिती चालत आलेली आहे. 


रामेश्वर मंदिर जीर्णोद्धार 
परकीय सत्तांच्या जुलुमी कारस्थानामुळे व नापमानाच्या गुंत्यात अडकल्याने गेली १०० वर्षे काही ठराविक उत्सव सोडले तर गावातील देवाचे वार्षिक बंद होते . आता नूतन मंदिर उभारणीनंतर पुन्हा केवळ आख्यायिका ठरलेले वार्षिक धुमधडाक्यात सुरु झाले पाहिजे.सारा लवाजमा घेऊन वाजत गाजत मिठबावचा रामेश्वर कुणकेश्वराच्या भेटीला जाईल व हा अभूतपूर्व सोहळा याची देही याची डोळा पाहता येईल, अशी ग्रामस्थांची इच्छा होती. ८ जून २०११ रोजी जीर्ण
मंदिराबाबत मिठबाव ग्रामदेवालये जीर्णोद्धार समिती मुंबई-मिठबाव व मिठबाव, तांबळडेग, कातवण ग्रामस्थ, मानकरी यांनी एकमुखी निर्णय घेऊन जीर्ण
झालेल्या श्री रामेश्वर मंदिराची पुनर्बांधणी करण्याचा निर्धार केला. मद्रासचे प्रसिद्ध आर्किटेक, डिझाईनर श्री. जी. श्रीनावसन यांच्याकडून तंजावरच्या श्री राजराजेश्वर मंदिरासारखे संकल्पचित्र तयार करून घेतले. सिंधुदुर्गातील तज्ञ इंजिनिअर आणि कॉन्ट्रॅक्टर श्री. अरुण भट यांच्याकडे मंदिर निर्माणाची
जबाबदारी सोपवली. पर्यटन क्षेत्राचे आकर्षण ठरावे अशी वास्तू निर्माण करण्याचा संकल्प १७ ऑक्टोबर २०११ रोजी झाला. ३१ ऑक्टोबर २०११ रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते शिलान्यास होऊन मंदिर उभारणीचा प्रारंभ झाला. मंदिराच्या प्रत्येक आविष्कारासाठी त्या-त्या विषयाचे तज्ञ कारागीर बेळगाव, कारवार, विजापूर, तंजावरहून आले. १४ फुट उंचीच्या गर्भाग्रहावर ३८ फुट उंचीचे शंकूच्या आकाराचे आमलकयुक्त भव्य शिखर, उत्तर-दक्षिण शिंपल्यावर १५ फुटांची उन्नत शिखरे ५४ स्तंभांच्या सभागृहावर अर्धगोलाकृती भव्य घुमट, छतावरील, स्तंभ-तुळ्यांवरील उत्कृष्ट संकल्पांचे पशुपक्षी, पाने- फुले, मानवी मुखवटे व केवलाकारी अलंकरण, श्री गणेश, नटराज, द्वारशक्ती व शिवपरीवाराच्या आकर्षक त्रिमित शिल्पकृती, नयनरम्य रंगरंगोटी या सौराभामुळे मंदिर चित्ताकर्षक झाले आहे. तीरुवायुचे श्री रामू, श्री शक्ती हे शिल्पज्ञ व त्यांचे सहाय्यक, कलावंत यांनी हि किमया घडविली आहे. मंदिरास साजेसे भव्य महाद्वार लक्षवेधक आहे. या नूतन वास्तूचे उद्घाटन देवमूर्ती प्रतिष्ठापना, वास्तूशांती व इतर धार्मिक कार्यक्रम तज्ञ वेदमूर्ती श्री दत्तात्रेय
शास्त्री मुरवणे व ब्रम्हवृदांकरवी ७ ते ११ मे २०१५ या दिवशी पार पडली
कालावधीत